India Pakistan ceasefire :-भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धविराम; परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी केली घोषणा…
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये मागील काही दिवसापासून युद्ध सुरू होते परंतु आज सायंकाळी पाच वाजता दोन्ही देशांनी युद्धाला विराम दिला आहे अशी घोषणा परराष्ट्रमंत्री सचिव विक्रम मिस्त्री यांनी केली आहे.
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी ही माहिती दिली आहे. दोन्ही देशांच्या DGMOs (Director General of Military Operations डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स) यांच्यात झालेल्या चर्चेनंतर युद्धविरामावर सहमती झाली.India Pakistan ceasefire
डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीबाबत माहिती दिली..
शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा दोन्ही देशांदरम्यान युद्धबंदीची घोषणा केली.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानने तात्काळ प्रभावाने युद्धविराम करण्यास सहमती दर्शवली आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टूथ सोशलवर ही माहिती दिली. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षणीयरित्या वाढला आहे.Read more